Ad will apear here
Next
सत्यजित
वैद्यकीय व्यवसाय आणि अध्यात्म यांची सांगड घालून डॉ. सुप्रिया भाटकर यांनी ‘सत्यजित’ ही कादंबरी वाचकांसमोर सादर केली आहे. डॉ. सत्यजित बल्लाळ एक हुशार सर्जन. इंटर्न विद्यार्थ्यांना त्याच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी मिळणे हे भाग्य होते. नेत्राला ही संधी मिळाली. तिला तो आवडत होता; पण हे त्याला सांगण्याची हिंमत होत नव्हती. अखेरीस तिचे प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांचा विवाह होतो. डॉ. सत्यजित आणि नेत्रा यांची प्रेमकहाणी यात असली, तरी त्याला अध्यात्माची साथ आहे. सत्या डॉक्टर असला, तरी गुरुमाऊलींचा भक्त होता. ही गोष्ट नेत्राला माहीत नव्हती. नेत्रासुद्धा शंकर महाराजांच्या मठात दर्शनासाठी जात असे. तिचीही गुरुमाऊलींवर भक्ती होती. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्यांच्याच आशीर्वादाने घडत असल्याचा तिचा ठाम विश्वास होता. एकदा योगीपुरुषाच्या रूपात तिला सत्यजित दिसतो. बरोबर गुरुमाऊलींचेही दर्शन होते. सत्यजितच्या अनोख्या रूपाची आणि त्यांच्या प्रेमाची गोष्ट ती लिहिते. कालांतराने त्या दोघांची मुलगी रेवा ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध करते.

पुस्तक : सत्यजित
लेखिका : डॉ. सुप्रिया भाटकर
प्रकाशक : विश्वकर्मा प्रकाशन
पृष्ठे : २००
मूल्य : २६० रुपये

(‘सत्यजित’ ही कादंबरी बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZSICC
Similar Posts
या कातरवेळी जन्म मृत्यूदरम्यानच्या जीवनातील सर्व अवस्थांपैकी वृद्धत्व ही काहीशी घाबरवून सोडणारी अवस्था असते; मात्र ती जीवनाची परीपूर्णताही असते, हे लक्षात घेऊन या अवस्थेला सामोरे जाण्याची ताकद प्रत्येकानेच मिळवायला हवी.
हॅलो मी प्रतिमानव शाळा-महाविद्यालयीन पुस्तकांमधील विज्ञान हे आपल्या रोजच्या जीवनचाच भाग असते. सध्याच्या यांत्रिक युगात तर विज्ञानशिवाय पान हालत नाही. यंत्रमानवासारख्या संकल्पना काही वर्षांपूर्वी काल्पनिक वाटत होत्या, त्या आता प्रत्यक्षात आल्या आहेत. यातूनच शरद पुराणिक यांनी विज्ञानरंजक कथा ‘हॅलो मी प्रतिमानव’मध्ये लिहिल्या आहेत
आनंदवनाचा विकास कुष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या ध्येयाने बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या जीवनात आनंद फुलविला. त्यांचे पुत्र डॉ. विकास आमटे यांनी बाबांचा वसा पुढे नेला. या विकासपुत्राची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा विकास’मधून कथन केली आहे.
योग्य नोकरी मिळवताना नोकरी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. नोकरी म्हटले की, मुलाखत ही पहिली पायरी मग तिचे तंत्र आणि मंत्र शिकणे हेदेखील ओघानेच आले. योग्य नोकरी मिळवताना या पुस्तकात मुलाखतीच्या तंत्रापासून व्यक्तिमत्त्व विकासापर्यंत अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. अगदी रेझ्युम लिहिण्यापासून ते कपड्यांची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language